<div id="MiddleColumn_internal"> <div class="plain"> <ul> <h3>उन्हाळ्याला तोंड देण्याचे पर्यावरण-मैत्रीपूर्ण उपाय</h3> <li style="text-align: justify; ">भरपूर पाणी प्या. बाटलीबंद पाणी पिणे टाळा कारण त्याच्यात चव असली तरी त्या पाण्यामधील नैसर्गिक पोषणमूल्ये नष्ट झालेली असतात.</li> <li style="text-align: justify; ">कॅफिनयुक्त पेये पिणे टाळा. ताकासारखे नैसर्गिक थंड पेय घ्या.</li> <li style="text-align: justify; ">फिकट रंगाचे विशेषत: सुती कपडे घाला.</li> <li style="text-align: justify; ">शरीरात पाण्याची कमतरता (डीहायड्रेशन) होऊ नये म्हणून पुष्कळ द्रव पदार्थ प्या. लिंबाचा रस, शहाळी, फळांचे रस इत्यादि नैसर्गिक द्रवपदार्थ आहेत. शहाळ्याच्या पाण्यात शर्करा, तंतुयुक्त पदार्थ (फायबर), व्हिटॅमिन (जीवनसत्त्व) व मिनरल्स (खनिजे) प्रमाणेच प्रथिने देखील असतात.</li> <li style="text-align: justify; ">भरपूर सॅलड आणि ज्यामध्ये नैसर्गिक स्वरूपात पाणी असते अशी ताजी फळे खा उदा. टरबुज. वास्तविक पाहतां ह्या फळामध्ये सुमारे 92% पाणी व 14% व्हिटॅमिन सी असते. घामाच्या स्वरूपात शरीरातून कमी होणार्या आर्द्रतेच्या घटकांचे प्रमाण टिकविण्यासाठी ह्याची मदत होते. तसेच ह्या फळामध्ये थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी (ब जीवनसत्त्व) आणि पोटॅशियम देखील आढळतात.</li> <li style="text-align: justify; ">मातीच्या भांड्यांमध्ये (माठात) साठवलेले पाणी प्या.</li> <li style="text-align: justify; ">तेलकट पदार्थ खाऊ नका/खाणे टाळा आणि विशेषत: फळ-विक्रेत्यांकडे मिळणारी चिरून-कापून ठेवलेली फळे खाऊ नका कारण अशा फळांवर माश्या आणि घूळ-माती बसलेली असतातच.</li> <li style="text-align: justify; ">हातपंखा जवळ बाळगा. वीज गेलेली असली तरी हा पंखा कामी येतो.</li> <li style="text-align: justify; ">एखाद्या उघड्या असलेल्या खिडकीवर वाळ्याचा पडदा लोंबत सोडा. ह्याच्यामुळे घरामध्ये थंड वारे खेळते राहील (चांगले वायुवीजन होईल).</li> </ul> </div> </div>