<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">तळेगाव हे गाव वर्धेपासुन ३० कि.मि. अंतरावर असुन आर्वी – वर्धा रोड्वर वसलेले आहे.या गावात एकुण कुटुंबे असुन 2000 लोकसंख्या आहे.येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व दुग्धव्यवसाय आहे.हे गाव आर्वी – वर्धा रोड्वर असले तरि गावाचा संपुर्न भाग जंगलांनी वेडलेला आहे.त्यामुळे जंगलामध्ये रान डुक्कर व रोही यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.</p> <p style="text-align: justify; ">येथील शेतकरी शेतात बी टाकल्यापसुन ते उत्पन्न घरि येईपर्यंत त्यांना शेतात जागल करावी लागते. अन्यथा त्यांनी पेरलेल्या बीयांण्यांचा खर्च सुध्दा निघत नाहि.शेतकर्यांना पावसाळ्यात पावासामधे व हीवाळ्यात थंडीमध्ये शेतात राहावे लागते. व त्यांची रात्रीला झोप होत नाही कारण त्यांना रात्रभर जागरण करावे लागते त्यामुळे त्यांची प्रकृती खालावते तसेच रात्रभर जागुन सुध्दा जंगली जनावरे पिक खातात व संपुर्ण पिक शेतकर्यांच्या घरी येत नाही.त्यामुळे त्यांची आर्थीक परिस्थीती खालावली. व शेतकर्यांना शेती परवडेनाशी झाली. शेतकरी जंगलकाठावरील शेती पडीत ठेवु लागले व जंगली जनावरांचा वावर गावांकडे होवु लागला. शेतकरी गावाजवळील शेतीसुध्दा पडीत ठेवु लागले. त्यांची आर्थीक परीस्थीती खाल्यावल्याने त्यांचेवर कर्जाचा बोझा वाढ्त राहीला.मुलांना चांगले शिक्षण देवु शकले नाही,मुलांच्या व कुटुंबाच्या गरजा पुर्ण करु शकले नाही.त्यामुळे त्यांचे मानसीक संतुलन बिघड्ले.</p> <p style="text-align: justify; ">त्यांनी हार न मानता जंगली जनावरांना रोकण्याकरीता सतत प्रयत्न करीत राहीले परंतु त्यांना परिपुर्ण यश आले नाही.तरीपण ते जनावरांना रोकण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना मार्ग सापड्ला.</p> <p style="text-align: justify; ">ती म्ह्णजे कमी खर्चाची सौर बॅटरी !</p> <h3>सौर बॅटरी मुळे मिळाले शेतकर्यांना जिवदन !</h3> <p style="text-align: justify; ">शेतकरी जंगली जनावरांना रोकण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना सौर बॅटरी विषयी कळले, काही लोकांनी त्याविषयी माहीती काढली व नंतर त्या शेतकर्यांनी सौर बॅटरी त्यांचे शेतामध्ये लावुन पाहीली त्यांचा चांगला फायदा झाला, त्यांचे पाहुन इतर शेतकर्यांनी सौर बॅटरी लावले व पाह्ता पाह्ता गावातील ७० % शेतकर्यांनी आपआपल्या शेतात सौर बॅटरी लावली. ती पण कमी खर्चात.</p> <h3>सौर बॅटरी मुळे शेतकर्यांना झालेला फायदा</h3> <ol> <li><span>शेतकर्यांना रखवालीपासुन मुक्तता,</span></li> <li><span>जंगली जनावरांनपासुन मुक्तता,</span></li> <li><span>शेतीतील पुर्ण पिक घरी येवु लागले,</span></li> <li><span>मजुरांना काम मिळु लागले,</span></li> <li><span>शेतकर्यांच्या आरोग्यात सुधारणा होवु लागली,</span></li> <li><span>आर्थीक परिस्थीतित सुधारणा होवु लागली.</span></li> <li><span>मुलांचे शिक्षण व इतर आवश्यक गरजा पुर्ण होवु लागल्या.</span></li> <li><span>शेतकर्यांना शेती करन्यात आवड निर्माण होवु लागलि.</span></li> </ol> <h3>सौर बॅटरी करीता होणारा खर्च -( 5 एकर करीता )</h3> <ol> <li><span>बॅटरी - ७५०० /-</span></li> <li><span>सौर पॅनल ४००० /-</span></li> <li><span>तार ६० किलो ३६०० /- ( गरजेनुसार )</span></li> </ol> <p style="text-align: justify; "><b>एकुण खर्च १५१०० /-( अक्षरी पंधरा हजार शंभर रुपये फक्त )</b></p> <b><i>आशय लेखक :</i></b><span> सचिन डोंगरे (खरांगणा)</span></div>