<p style="text-align: left; "><span><span>‘</span></span><span><span>पाणी वाढवता येत नाही</span></span><span><span>, </span></span><span><span>केवळ व्यवस्थापित केले जाऊ शकते</span></span><span><span>’ </span></span><span><span>असे रामदास अतिशय तात्विकपणे आणि जबाबदारीने सांगत होते. पुणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागातील उपसरपंच असल्यामुळे पाण्यासाठी गावकऱ्यांना होणारा त्रास पाहिल्यामुळे त्यांना हे शहाणपण आले होते.</span></span></p> <p style="text-align: left; "><span><span>रामदास हे पुणे जिल्ह्यातील उगलेवाडी गावातील भोजनेवाडी</span></span><span><span>, </span></span><span><span>या टेकडीवरील </span></span><span><span>40</span></span><span><span> घरांची वस्ती असलेल्या भागातील रहिवासी आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या समुदायाने विशेषतः महिलांनी स्वच्छ पाण्यासाठी घेतलेले कष्ट जवळून पाहिले आहेत. भौगोलिक रचनेमुळे गावातील पिण्याचे पाणी नळाच्या माध्यमातून याठिकाणी पोहोचवणे कठीण आहे.</span></span></p> <p style="text-align: left; "><span><span>उगलेवाडी येथील मुख्य गावठाणात नदीचे पाणी टाकीत जमा करुन नळाच्या माध्यमातून पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. या माध्यमातून गावठाणातील प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा केला जातो. मात्र</span></span><span><span>, </span></span><span><span>भोजनेवाडी पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. उंचवटा आणि बेसाल्ट खडकाचा भूभाग असल्यामुळे अगोदर भोजनेवाडी </span></span><span><span>‘</span></span><span><span>शिवकालीन पाणीसाठा योजने</span></span><span><span>’</span></span><span><span>वर अवलंबून होते.</span></span></p> <p style="text-align: left; "><span><span>परिसरातील लोकांचा विशेषतः महिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी रामदास यांनी भागाला स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी वस्तीजवळच </span></span><span><span>5,000</span></span><span><span> लिटर क्षमतेची टाकी बांधली. यामुळे दूर अंतरावरुन पाणी आणण्याचा त्रास वाचला. या टाकीत शिवकालीन साठ्यातून सायफन पद्धतीने पाणी चढवण्यात आले आणि सर्व </span></span><span><span>40</span></span><span><span> घरांना नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आला. टाकीचा पाणीसाठा सुधारण्यासाठी</span></span><span><span>, </span></span><span><span>युनिसेफ-मुंबईस्थित </span></span><span><span>‘</span></span><span><span>ड्रॉप ऑफ होप</span></span><span><span>’ </span></span><span><span>आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून टाकीची खोली वाढवण्यात आली आणि दुरुस्ती करण्यात आली.</span></span></p> <p style="text-align: left; "><span><span>पाणीपुरवठा सुरळीत आणि गुणात्मक व्हावा</span></span><span><span>, </span></span><span><span>यासाठी रामदास यांनी स्थानिकांना जमा केले आणि वर्षभरातील पिण्याच्या पाण्याविषयीचे काही नियम घालून दिले. नागरिकांनीही पाण्याच्या योग्य वापराविषयी नियम घालून घेतले. भोजनेवाडीने</span></span><span><span>, </span></span><span><span>केवळ पावसाळ्यातच सायफन पद्धती वापरण्याच निर्णय घेतला. उर्वरीत आठ महिन्यांमध्ये शिवकालीन साठ्यांमधून पाणी आणण्यात येते.</span></span></p> <p style="text-align: left; "><span><span>हे लोकसहभागातून विकेंद्रित पाणी व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण बनले आहे. पाण्याचा योग्य वापर होत असल्यामुळे</span></span><span><span>, </span></span><span><span>भोजनेवाडीला आता उन्हाळ्यातही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही.</span></span></p> <p style="text-align: left; "><span><span>महाराष्ट्रातील पाण्याचे संकट वर्षानुवर्षाचा दुष्काळ आणि अनियमित पावसामुळे आणखी गंभीर बनले आहे</span></span><span><span>, </span></span><span><span>कमी होत जाणारी पाणी पातळी धोक्याची घंटा आहे. अशा परिस्थितीत</span></span><span><span>, </span></span><span><span>भोजनेवाडीतील गावकऱ्यांनी समुदाय सहभागितेने केलेले कार्य ताज्या हवेची झुळूक असल्यासारखे आहे. केंद्र सरकारची प्रमुख योजना जल जीवन मिशन- ग्राम पंचायती</span></span><span><span>, </span></span><span><span>स्थानिक समुदाय आणि रामदास यांच्यासारखे खरे हिरो यांना खेड्यांमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन</span></span><span><span>, </span></span><span><span>अंमलबजावणी</span></span><span><span>, </span></span><span><span>व्यवस्थापन</span></span><span><span>, </span></span><span><span>कृती आणि देखभाल आणि गावकऱ्यांमध्ये जागृती करते</span></span><span><span>, </span></span><span><span>यात योजनेचे यश आहे.</span></span></p> <p style="text-align: left; "><span><span>जल जीवन मिशनच्या माध्यमातून दररोज एका व्यक्तीला </span></span><span><span>55</span></span><span><span> लिटर पाणी पुरवण्याचे लक्ष्य आहे आणि देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नियमितपणे दीर्घकालीन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यात येईल. ग्रामीण भागात प्रत्येक घरासाठी नळ जोडणीची तरतूद केल्याने महिला</span></span><span><span>, </span></span><span><span>विशेषत: मुलींचे </span></span><span><span>‘</span></span><span><span>कंटाळवाणे</span></span><span><span>’ </span></span><span><span>काम दूर होण्यास मदत होईल. तसेच यामुळे ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सुधारणा होईल.</span></span></p> <p style="text-align: left; "><span><span><b>Source : PIB</b></span></span></p> <div style="text-align: left; "><span><span><br /></span></span></div>